Monday, October 3, 2011

देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?


वीपूजनाची सांगता देवीला खण व साडी अर्पण करून, म्हणजेच देवीची ओटी भरून करायची असते. देवीला खण व साडी अर्पण करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. सर्व पंचोपचार पूजाविधी हे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी निगडित आहेत. देवीला खण व साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने, त्या आधी केलेल्या पंचोपचार विधींतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी व खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
अ. `देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे सगुण देवीतत्त्व जागृत होण्यास मदत होते.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

शक्ती उपासनेचे नवरात्र


नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे संत-महंतांची तपस्या असणे आवश्यक आहे. तपश्चर्येला यश मिळते ही गोष्ट सत्याच्या उपासकांना विसरून चालणार नाही. 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्रोत्सवाची एक प्रसिद्ध कथा आहे. महिषासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिलोकात अत्याचाराचे थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे सर्वजण दु:खी झाले होते. या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना केली. 

देवांची प्रार्थना ऐकून आद्यदेव महिषासुरावर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांच्या पुण्य प्रकोपाने एक दैवी शक्ती प्रकट झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचा जय-जयकार करून तिचे पूजन केले. तिला आपल्या दिव्य शस्त्रांनी सजविले. या देवीने सलग नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. नंतर दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. ती दैवी शक्ती म्हणजे दुसरे कुणीही नसून आपली जगदंबा माता आहे.

नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळविला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योती लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय. 

राक्षस हा मोठमोठे दात, नख, लांबलचक केस, मोठे डोळे असलेला भयानक प्राणी असतो अशी आपली कल्पना आहे. वास्तविक राक्षस म्हणजे 'असुषु रमन्तेइति असुरा:' प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहत असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तीवाद आणि स्वार्थीपणाची अमर्याद‍ीत वाढ झाली असून तो महिषासुराच्या रूपाने नांदत आहे. या मह‍िषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. 

वेदांत शक्तीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे. महाभारताचे प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेने भरलेले आहे. महाभारतात पांडवांना धार्मिक मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर केवळ हात जोडून बसून चालणार नाही तर शक्तीची उपासना करावी लागेल असा सल्ला महर्षी व्यासाने दिला होता. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांनीच स्वर्गात जाण्याचे मार्गदर्शन केले होते. 

अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारावर संकट आले तेव्हा तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ती मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाही तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ती उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तीच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे. 'संघे शक्ती: कलै युगे' हे लक्षात ठेवून नवरात्रीच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे. 

या संघटनेच्या मुख्य स्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीने आपल्याला शक्ती प्राप्त होईल, हे सुचित करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात गरबा आणि रासलीलेच्या रूपात देवी भोवताली फेर धरला जातो. देवीजवळ फिरता-फिरता आपण हे मागितले पाहिजे की, 'हे देवी! आम्हाला सदसदवि‍वेक बुद्धी दे. आमच्या संघटनेत अहंकार, द्वेष येत आहे. त्याला तू नष्ट कर.' देवी जगदंबेची ही उपासना नवरात्रीत सुरू होते. परंतु केवळ नऊ दिवसासाठी मर्यादीत न ठेवता कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.


Sunday, October 2, 2011

दैनिक लोकमत


गाव करील ते राव काय करील?


     स्थानिक पुढा-यांच्या किंवा शासनाच्या भरवशावर बसले तर विकासकामे पार पडण्यास वर्षानुवर्षे लागतात. सर्वसाधारणपणे छोट्या-छोट्या गावातील ग्रामस्थांना येणारा हा नित्याचा अनुभव. परंतु नेवासा तालुक्यातील घोडेगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. या गावातील ग्रामस्थांनी (विशेषत: तरुण वर्गाने) नुकत्याच हाती घेतलेल्या सत्कार्यामुळे 'गाव करील ते राव काय करील?' असेच सध्या म्हणावे लागत आहे.


     जागृत देवस्थान 'घोडेश्वरी देवी' हे घोडेगावचे ग्रामदैवत. या देवीचे एक पुरातनकालीन हेमाडपंथी मंदिर गावात आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आणि चैत्र कृष्ण पंचमीला तेथे देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राजकीय दृष्टीकोनातूनही घोडेगावला नेवासा तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपआवार, जनावरांचा आठवडे बाजार (प्रामुख्याने म्हैस आणि बैलांचा), जवळच असलेले शनीशिंगणापूर, ही घोडेगावची मुख्य ओळख. पण कित्येक वर्षे उलटूनही या मंदिराच्या विकासाला लागलेले ग्रहण मात्र सुटले नाही.
     गावात आणि तालुक्यात अनेकदा राजकीय सत्तांतर झाले. दर निवडणुकीला गावच्या विकासासोबत मंदिराच्या विकासाचाही सूर आळविला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावातील तरुणाईनेच पुढाकार घेतला आणि १५ फेब्रुवारीला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. मात्र हे सत्कार्य करीत असताना वर्षानुवर्षे आश्वासनांचे गाजर दाखविणा-या पुढारी किंवा शासनापुढे या तरुणाईने हात पसरले नाहीत. स्वकष्टातून आलेल्या मिळकती मधील 'खारीचा वाटा' बाजूला काढून त्यातून हे सत्कार्य तडीस न्यायचा या तरुणाईचा मानस आहे.
     'घोडेश्वरी देवी मंदिर विकास समिती'च्या माध्यमातून या मंदिर परिसराचा विकास सध्या सुरु आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत, आतील परिसराचे सुशोभिकरण, बगीचा, वाहनतळ आणि प्रवेशद्वार असे या कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी कमीत कमी सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. गावातील कुठलेही धार्मिक कार्य (मग ते यात्रोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव) असो, वर्गणी आलीच आणि घोडेगावात तर वर्गणीला तोटाच नाही. एकट्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची वर्गणी गोळा होते. गावकरी या मार्गाने गेले असते तर मंदिराचे काम केंव्हाच पूर्णत्वास गेले असते.
     पण घोडेगावकरांनी या मंदिराचा विकास करायचा, मात्र त्यासाठी 'बाहेरच्या' लोकांपुढे हात पसरायचे नाही, मदतीसाठी कोणावर सक्ती करायची नाही, असे ठरविले. ज्याची इच्छा असेल तो मदत देईल, या भावनेतून काम सुरु झाले. मंदिराच्या विकासकामात आपापला 'खारीचा वाटा' टाकण्यासाठी इतर ग्रामस्थही मग पुढे आले. कुणी रोख रकमेच्या स्वरुपात, कुणी बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत दिली आणि सत्कार्यात सहभागी झाले.
     बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, ग्रील, रंग, खिळे, असे साहित्य गोळा झाले. ज्या गावक-यांनी अशी मदत दिली, त्यांची नावे रोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जातात. कुणाला 'गुप्तदान' करायचे असेल तर त्याचेही नाव 'गुप्त' देणगीदारांच्या यादीत नोंदविले जाते. ज्यांना यापैकी काही शक्य झाले नाही ते प्रत्यक्ष श्रमदान करायला पुढे आले. एखाद्या दिवशी कामावर कुणी नसले तर गावातील 'तरुणाई' स्वत: उन्हात राबते. त्यामुळे या कामाने आता वेग घेतला असून संरक्षक भिंतीचे काम आता प्रगतीपथावर आहे.
     'घोडेश्वरी देवी'चा यात्रोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसे पाहता २० लाख रुपयांची रक्कम काही थोडी नाही. मात्र ग्रामदेवतेवर निष्ठा ठेवून सत्कार्यासाठी पुढे आलेली 'तरुणाई' देखील आपल्या निश्चयावर तितकीच ठाम आहे. लोकसेवकांच्या स्थानिक निधीतून किंवा शासकीय योजनेतून पार पडलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी मंडळी आपण पाहतो. परंतु घोडेगावची झपाटलेली तरुणाई मात्र वेगळीच. त्यांना प्रसिद्धी अजिबात नकोय.
     या 'तरुणाई'सोबत संवाद साधला असता, ''आम्हाला एकाच ध्यासाने झपाटलंय, ते म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिराचे सुशोभिकरण आणि विकास. त्याकरिता शासकीय योजनेची खैरात किंवा पुढा-यांचा पैसा आम्हाला नको. 'आई घोडेश्वरी'चा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मनात अढळ आत्मविश्वास आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद देखील आमच्या मनगटात आहे.'' असे ते सांगतात. आणखी काय हवे. सत्कार्यासाठी जर गाव एकत्र आले तर अशक्य काय आहे. एकीकडे आजकालच्या युवकांना विकासाचे घेणे-देणे नाही, असा टोमणा मारला जातो. परंतु घोडेगावच्या तरुणांनी मात्र आपल्या कृतीतून परिसरात आणि इतर गावांपुढे नवा आदर्श उभा केला आहे.


Saturday, October 1, 2011

!! घोडेश्वरी !!


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव .
गावच इतिहास फार जुना आहे.
साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव , गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण  झाले असावे . कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते
  गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने  सर्व गावकऱ्यांनी  पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .
एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला ,  त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव , फावडे , खोरे,  घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने  १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली  तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे  गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला . काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही  केले.

  काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका  साधूने  गावाकर्याना  त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले ,त्या नंतर  एका शुभ मुहूर्तावर  तुळजाभवानी ची पूजा करून  विहीर खांदण्यास  सुरुवात केली , पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले ?
               त्या दिवशी मंगळवारच दिवस होता , विहीर खांदण्याचे  काम चालू असतानाच सहा परसाच्या  पुढे आचानक चमत्कार  झाला ,  विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी  म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली , सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला  कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना  भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली
             अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन  गावाच्या पाटलाच्या स्वप्नात  देवी आली  आणि `` मी घोडेश्वरी देवी आहे माझी  प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या  मंदिरात करा , यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून  देवी अंतर्धान  पावली .
           सकाळी  पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना  खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून  त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची  प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात  केली.   त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर  सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या
मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस  विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही ,बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास  सांगितले .
             दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून  गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच  अचानक  विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड  होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे . त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

   विहिरीतून प्रगट झालेल्या  देवीची मुर्ती ही आश्वरुपी , घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले  आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने  गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव  या नावाचा अपभ्रंश होऊन  घोडेगाव हे नाव रूढ झाले
 याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला , बागायत झाला  आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे . .
  मूर्तीचे वैशिष्ट्य  मुर्ती स्वयंभु आसून  कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे , मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी   आसून मोठ - मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .
देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************
प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा  घाना चालत नाही .
कुंभाराचे चाक चालत नाही
तसेच गावात कुणी घोडे पळत नाही ,
स्थानिक सोनार   व्यवसाय गावात चालत नाही .
कुठलाही गुंड , समाज विरोधक  काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही .
 यात्रेत गोंधळ करणारा , मारामाऱ्या करणारा  पुढची यात्रा बघत नाही , हा इतिहास आहे .


 आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन  मंदिर जीर्नौधाराचे  काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे , साथ दिली आहे. काम्पौनडचे  काम पूर्ण होत आले आहे , सभामंडप  एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे . आपणही या कार्यास आर्थिक मद्दत करू शकता