Saturday, October 1, 2011

!! घोडेश्वरी !!


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव .
गावच इतिहास फार जुना आहे.
साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव , गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण  झाले असावे . कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते
  गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने  सर्व गावकऱ्यांनी  पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .
एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला ,  त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव , फावडे , खोरे,  घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने  १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली  तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे  गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला . काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही  केले.

  काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका  साधूने  गावाकर्याना  त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले ,त्या नंतर  एका शुभ मुहूर्तावर  तुळजाभवानी ची पूजा करून  विहीर खांदण्यास  सुरुवात केली , पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले ?
               त्या दिवशी मंगळवारच दिवस होता , विहीर खांदण्याचे  काम चालू असतानाच सहा परसाच्या  पुढे आचानक चमत्कार  झाला ,  विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी  म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली , सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला  कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना  भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली
             अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन  गावाच्या पाटलाच्या स्वप्नात  देवी आली  आणि `` मी घोडेश्वरी देवी आहे माझी  प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या  मंदिरात करा , यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून  देवी अंतर्धान  पावली .
           सकाळी  पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना  खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून  त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची  प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात  केली.   त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर  सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या
मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस  विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही ,बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास  सांगितले .
             दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून  गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच  अचानक  विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड  होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे . त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

   विहिरीतून प्रगट झालेल्या  देवीची मुर्ती ही आश्वरुपी , घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले  आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने  गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव  या नावाचा अपभ्रंश होऊन  घोडेगाव हे नाव रूढ झाले
 याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला , बागायत झाला  आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे . .
  मूर्तीचे वैशिष्ट्य  मुर्ती स्वयंभु आसून  कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे , मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी   आसून मोठ - मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .
देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************
प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा  घाना चालत नाही .
कुंभाराचे चाक चालत नाही
तसेच गावात कुणी घोडे पळत नाही ,
स्थानिक सोनार   व्यवसाय गावात चालत नाही .
कुठलाही गुंड , समाज विरोधक  काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही .
 यात्रेत गोंधळ करणारा , मारामाऱ्या करणारा  पुढची यात्रा बघत नाही , हा इतिहास आहे .


 आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन  मंदिर जीर्नौधाराचे  काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे , साथ दिली आहे. काम्पौनडचे  काम पूर्ण होत आले आहे , सभामंडप  एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे . आपणही या कार्यास आर्थिक मद्दत करू शकता









1 comment:

  1. छान ब्लॉग लिहिला डॉक्टर

    ReplyDelete