Thursday, September 29, 2011

सरस्वती पूजन


नवरात्र महोत्सवात अश्‍विन शुद्ध नवमीला "सरस्वती पूजन' करण्याचा प्रघात आहे.
देवी सरस्वतीचे वर्णन ऋषी असे करतात-

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना।। 
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।। 

भारतीय वाङ्‌मयात "सरस्वतीयाचा अर्थ दोन प्रकारे आहेएक नदी म्हणून व दुसरा देवी-देवता म्हणून!

सरस्वती नदीची उत्पत्ती 
प्राचीन वाङ्‌मयात सरस्वती ही ब्रह्मदेवांची कन्या म्हणून उल्लेख आहेतिला एकदा पुरुरवा या राजाने पाहिलेतिचे अप्रतिम सौंदर्य पाहून राजा अत्यंत मोहित झालापुरुरव्याने त्याची प्रिया उर्वशीतिच्या मध्यस्थीने या सरस्वतीला घरी बोलविलेत्या वेळी पुरुरव्याला न राहविल्यामुळे सरस्वतीचा कौमार्यभंग केलाहे जेव्हा ब्रह्मदेवांना समजले तेव्हा ते रागावले व दोघांना शाप दिलासरस्वतीला ते म्हणाले, ""यापुढे भूतलावर तू नदी म्हणून वाहत राहशील.'' त्याप्रमाणे ती "सरस्वती नदीम्हणून वाहू लागली.

पद्मपुराणात सृष्टीखंडात सरस्वती नदीची उत्पत्ती सांगितली आहेती अशी -
एकदा भूतलावर वडवाग्नीने प्रचंड असा प्रलय मांडला होतादेव-दानव व सर्व पृथ्वी होरपळून निघत होतीम्हणून ऋषीमंडळींनी ब्रह्मदेवांना यापासून वाचवण्याची प्रार्थना केली.
तेव्हा ब्रह्मदेवांनी या अग्नीला एका पात्रात कोंडून ठेवले व ते पात्र सागराकडे घेऊन जाण्यास कन्या सरस्वतीस सांगितलेकन्या सरस्वती हा अग्नी घेऊन जाण्यास तयार नव्हतीपरंतु पित्याची आज्ञा म्हणून हे अग्निपात्र घेऊन जाऊ लागलीपरंतु अग्नीचे तेज तिला सहन न झाल्यामुळे ती त्यामुळे जलरूप झालीतिचे नाव "सरस्वती नदीहोय.
ही सरस्वती नदी अत्यंत वेगवान अशी नदी असूनवरुणाच्या मुखात पडते. (ऋग्वेद 6.11.63) हिची निर्मिती प्रजापतीकडून झालेली आहेही नदी पर्वतावर उगम पावून सागराला मिळतेपरंतु द्वापारयुगात तिचे जल आटले व राजस्थान वाळवंटात ती अडकून पडली आहेपरंतु पुढे प्रयाग क्षेत्रात ती गंगा-यमुना या नद्यांच्या संगमात गुप्त रूपाने येऊन मिळाली असल्याने या संगमाला "त्रिवेणी संगमम्हणतात.

सरस्वती देवी म्हणून उत्पत्ती 
ब्रह्मदेवांनी सबंध सृष्टी निर्माण केलीत्याबरोबर प्रजोत्पत्तीही केली.ब्रह्मदेवांच्या वामांगापासून शतरूपा राणी व उजव्या अंगापासून स्वायंभुवमनु निर्माण झालेया शतरूपा राणीनंतर सावित्रीब्राह्मणी व सरस्वती या स्त्रिया निर्माण झाल्यायातील सरस्वती ही ब्रह्मदेवांची पत्नी झाली
देवी भागवतात देवीची उत्पत्ती सांगताना सांगितलेकी राधा-राणीच्या जिव्हाग्रापासून या देवीचा जन्म झाला.

ही जेव्हा सगुणरूपात प्रकट झालीतेव्हा तिने श्रीकृष्णाला वरण्याची इच्छा प्रदर्शित केलीपरंतु भगवान श्रीकृष्णाला तिच्याबरोबर राहणे योग्य वाटले नाहीसबब त्याने तिला शाश्‍वत रूप दाखवले व तिचे समाधान करून तिला परब्रह्मस्वरूपी भगवंताला शरण जाण्यास सांगितलेतसेच भगवंताच्या आज्ञेने ती ज्ञानीमहात्मेनिष्ठावान प्रेमळ भक्त यांच्या जिव्हाग्रभागी राहू लागली
पद्मपुराणात पुष्कर माहात्म्यात असे सांगितले आहे, ""एकदा पृथ्वीवर दीर्घ काळ दुष्काळ पडला होतात्याचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्याचे ठरविलेपरंतु यज्ञ कोठे करावाहे ठरविताना त्यांनी स्वर्गातून एक पद्म (कमळभूमीवर टाकलेते पद्म ज्या ठिकाणी पडले ते पुष्करतीर्थ म्हणून प्रसिद्ध पावलेसबंध भारत देशात पुष्कर क्षेत्री फक्त ब्रह्मदेवांचे मंदिर आहे.
या पवित्र क्षेत्रात ब्रह्मदेवांनी यज्ञ सुरू करताना त्यांची पत्नी सरस्वती हिला आवाहन केलेपरंतु ती यज्ञकार्यात वेळेवर येऊ शकली नाहीपण यज्ञकर्माचा मुहूर्त टळू नये म्हणून ब्रह्मदेवांनी इंद्राला दुसरी स्त्री आणण्यास सांगितले. (कारण यज्ञकर्म हे सपत्नीकांनी व पत्नीबरोबरच करावेहा दंडक आहेतेव्हा इंद्राने एक गोप स्त्री आणून गाईच्या मुखातून तिला काढून तिची शुद्धी केली(एक वेदोक्तपुराणोक्त विधी आहेआणि ती ब्रह्मदेवाजवळ बसविलीती"गायत्रीम्हणून प्रसिद्ध पावली.

यज्ञकर्म सुरू झाले आणि काही वेळाने आपल्या सख्यांबरोबर सरस्वती देवी आपल्या लवाजम्यानिशी मंडपात आलीआपल्या जागेवर दुसरी स्त्री पाहून ती रागावली व तिने सर्वांना शाप दिलातो असा

1) ब्रह्मदेवाची पूजा लोक वर्षातून एकदा करतील
2) इंद्राला कुठल्यातरी परक्‍या देशात शृंखलाबद्ध होऊन पडावे लागेल
3) विष्णूने यात सहकार्य केले म्हणून त्याला मानवयोनीत गुराखी व्हावे लागेल (श्रीकृष्ण झाले). 
4) रुद्रांचा शूरपणा नष्ट होईल.
5) अग्नी सर्वभक्षक बनेल
6) ब्राह्मण उपाध्याय यापुढे फक्त दक्षिणा मिळविण्याच्या दृष्टीने धार्मिक विधीयज्ञकर्म करतीलनंतर लक्ष्मीदेवीने तिच्याशी मध्यस्थी केली व सरस्वती देवीचा राग शांत केला.

ब्रह्मदेवाने पुष्कर तीर्थावर सरस्वतीसाठी एक सरोवर तयार केलेकाही दिवसांनी सरस्वतीलक्ष्मीगंगा यांचे तिघींचे एकमेकांशी भांडण झाले.त्यामुळे नारायण परमात्म्याने सांगितलेकी सरस्वती एक अंशरूपाने पृथ्वीवर नदी म्हणून राहील व एक अंशरूपाने ब्रह्मदेवांची पत्नी म्हणून राहील.
कलियुगाची पाच हजार वर्षे लोटली म्हणजे ती नदीचा गुप्तपणा सोडून उघडपणे वाहू लागेलत्यानंतर ब्रह्मदेवाने तिला आवाहन केलेतेव्हा ती म्हणाली, ""मला पापी लोकांचा संपर्क न व्हावा म्हणून मी गुप्त राहीन व आपली आज्ञा होता क्षणीया पुष्कर क्षेत्रात प्रकट होईन.''

तसेच लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदणार नाहीतअसे सांगितलेत्यामुळे धनवान माणूस बुद्धिमान असतोअसे नाही व बुद्धिमान माणूस धनवान होईलचअसे असू शकत नाहीकेवळ ईशकृपा व सद्‌गुण संपदेने या एकत्र नांदताना दिसतात
सरस्वती देवीचे कार्य 
ऋग्वेदात या देवीचे गुणगान असे केले आहेकी ती ब्रह्मदेवाची पत्नीसर्वांची रक्षणकर्तीअन्नपाणी पुरविणारीसर्वांना सामर्थ्यसंपन्न करणारीदान देणाऱ्यांना उत्तम वरदान देणारीधन्याला संतुष्ट करणारीयज्ञकर्मात विपुल धान्य देणारी आहेतसेच शुक्‍ल यजुर्वेदात तिचे वर्णन आले आहेया वेदात तिला इडाभारती व सरस्वती या प्रजाय देवता (नव निर्माण करणाऱ्याअसून मरुतविराटगायी या इंद्रिय शक्ती व दीर्घायुष्य देवोही प्रार्थना करतात

या सरस्वतीला वेळकाळ व कार्यानुरूप भारतीब्राह्मीपुटकारीशारदा,वागीश्‍वरीवीणा इत्यादी नावे प्राप्त झाली आहेत.
प्रामुख्याने ही सरस्वती विद्यादेवता म्हणून अवतीर्ण झाली आहेब्रह्मदेवांची आज्ञा म्हणून तिने सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगाच्या प्रारंभी पवित्र व योग्य मानवाच्या जिव्हाग्रावर प्रवेश केलाया भूतलावर प्रथम तिने तमसा नदीवर एका ऋषींच्या जिव्हेवर प्रवेश केलाते ऋषी म्हणजे वाल्मीकी होतव्याधाने एका क्रौंच पक्ष्याला ठार केलेत्याची प्रिया शोक करीत असता वाल्मीकींनी त्या पक्ष्याची शुश्रूषा केलीहे करुणाजनक दृश्‍य पाहून सरस्वतीला दया आली आणि त्याचे वर्णन करण्यासाठी ऋषींच्या मुखात प्रवेश केल्याबरोबर या भूतलावर पहिले काव्य बाहेर पडले.

ते म्हणू लागले
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्‍वतीः सम। 
यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्‌।। 


या काव्यामुळे वाल्मीकींना आदिकवीचा मान मिळाला
ऋग्वेदात 10-32-12 मध्ये सरस्वतीचा संबंध बुद्धीशी व अमृत शब्दाबरोबर जोडला आहेकारण वेदवाङ्‌मयात "ज्ञावर्गातील काही देवता स्वीकारल्या आहेतया "ज्ञावर्गातील वाग्‌देवता म्हणून ही सरस्वती आहेया "ज्ञा'वर्गातील देवतादेवतांचेतसेच मानवाचे कार्य समृद्धी व फलोत्पादन करणाऱ्या म्हणून आहेत.
त्यामुळे मातृशक्ती म्हणून हिचे महत्त्व मानले आहेसरस्वती देवी बुद्धीला गतिमानता व तेजस्विता देत असल्याने सर्व ऋषीसाधूसंत महात्मे हिचे गुणगान करतातहीच भगवती सरस्वती भाषाकाव्यकलाअलंकार इ.गुणांची जननी म्हणून मानली आहे.

ही सरस्वती देवी हंसवाहिनी आहेनाथ महाराज तिचे वर्णन करतात


सारासार निवडी जनी। 
त्या हंसावरी हंसवाहिनी।। 


अशी ही देवता असूनसर्व वस्तुमात्रांमध्ये योग्य निवडीचे ज्ञान देणारी ही देवता आहे
सरस्वती देवीचे स्वरूप -
सरस्वती देवी ही शुभ्रकमलावर किंवा हंसावर आरूढ दिसतेहिचा वर्ण शुभ्र असून शुभ्र वस्त्र परिधान केले आहेही चतुर्भुजा असून उजव्या हातात अक्षमाला व व्याख्यानमुद्रा आहेडाव्या हातात पुस्तक व कमळ आहेकधी स्फटिक माला गळ्यात असताततर कधी वीणा हातात असतेगळ्यात यज्ञोपवीत असून अंगावर रत्नजडित अलंकार आहेतशृंगेरी मठात या वर्णनाबरोबर सरस्वतीच्या हातात मालाअमृतकुंभपोपट व हंसवाहनी असे स्वरूप स्वीकारले आहे
असे या देवीचे स्वरूप आहे
नवरात्रातील पूजन -
नवरात्र उत्सवातसरस्वतीचे म्हणून काही भागांत परंपरेनेआवाहन अष्टमीला, "पूजननवमीला, "विसर्जनदसऱ्याला करतात किंवा सप्तमी,अष्टमी व नवमी तिथीला आवाहनपूजनविसर्जन विधी करताततर काही भागांत फक्त नवमीला सरस्वतीचे पूजन करतातमहाराष्ट्रात साधारणपणे घराघरात नवमीला सरस्वती पूजनाचा विधी करतातया पूजनात ग्रंथपोथी,पुस्तक यांचे पूजन असतेतसेच मूर्ती वा फोटोचे पूजन (वर वर्णन केल्याप्रमाणेकरण्याचा प्रघात आहे
अशा सरस्वती देवीस शब्दरूपाने वंदन करू या!

सौजन्य -- सुस्मिता  जोशी

No comments:

Post a Comment