Thursday, September 29, 2011

सप्तशृंगी देवी


देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. ऐतिहासिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. तसेच महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.कोणत्याही पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहेसह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड.एकीकडे खोल दरीतर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाईअसा निसर्ग घेऊन येथे उभी 
ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहेमातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झालीतिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होतेअसे सांगितले जातेया देवीचे महात्म्य मोठे आहे.देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. 
त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेतत्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे.याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाहीया देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवीमहाकालीमहालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवीअसे मानले जातेनाशिकच्या तपोवनात रामसीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असतायेथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.
देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जातेएका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला.त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडलीअशीही एक दंतकथा आहे.
येथील निसर्गाचे रूप रम्य आहेडोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहेतिला अठरा भुजा आहेतमूर्ती शेंदूरअर्चित असूनरक्तवर्ण आहेडोळे टपोरे व तेजस्वी आहेतसर्व हात एकमेकांना लागून आहेतसर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.
शंकराचे त्रिशूलविष्णूचे चक्रवरुणाचा शंखअग्नीचे दाहकत्ववायूचा धनुष्यबाणइंद्राचे वज्र व घंटायमाचा दंडवरुणाचा पाशदक्षप्रजापतीची स्फटिकमालाब्रह्मदेवाचे कमंडलूसूर्याची किरणेकालस्वरूपी देवीची तलवारक्षीरसागराचा हारकुंडले व कंकणविश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहारहिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.
मूर्ती काहीशी झुकलेली आहेत्याबाबतची कथाही गमतीदार आहे.गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होतेत्यांची प्रार्थना देवी ऐकत होतीतेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होतेचैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतातचैत्रात देवीचे रूप हसरेतर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जातेचैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचातर नवरात्रोत्सव सासरच्यांचा,असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जातेनवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतातदेवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतोदेवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येतेतिला अकरा वार साडी लागते. 
चोळीसाठी तीन खण लागतातनऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जातेनवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जातेत्यानंतर नेवैद्य दाखविला जातोदसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहेहा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहेमात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.
गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेतमार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे.याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेतपूर्वी 108 कुंडे होतीमात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेतयाशिवाय तांबुलतीर्थकाजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेततांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहेदेवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

No comments:

Post a Comment