Monday, October 3, 2011

देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?


वीपूजनाची सांगता देवीला खण व साडी अर्पण करून, म्हणजेच देवीची ओटी भरून करायची असते. देवीला खण व साडी अर्पण करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. सर्व पंचोपचार पूजाविधी हे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी निगडित आहेत. देवीला खण व साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने, त्या आधी केलेल्या पंचोपचार विधींतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी व खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
अ. `देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे सगुण देवीतत्त्व जागृत होण्यास मदत होते.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

शक्ती उपासनेचे नवरात्र


नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे संत-महंतांची तपस्या असणे आवश्यक आहे. तपश्चर्येला यश मिळते ही गोष्ट सत्याच्या उपासकांना विसरून चालणार नाही. 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्रोत्सवाची एक प्रसिद्ध कथा आहे. महिषासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिलोकात अत्याचाराचे थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे सर्वजण दु:खी झाले होते. या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना केली. 

देवांची प्रार्थना ऐकून आद्यदेव महिषासुरावर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांच्या पुण्य प्रकोपाने एक दैवी शक्ती प्रकट झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचा जय-जयकार करून तिचे पूजन केले. तिला आपल्या दिव्य शस्त्रांनी सजविले. या देवीने सलग नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. नंतर दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. ती दैवी शक्ती म्हणजे दुसरे कुणीही नसून आपली जगदंबा माता आहे.

नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळविला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योती लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय. 

राक्षस हा मोठमोठे दात, नख, लांबलचक केस, मोठे डोळे असलेला भयानक प्राणी असतो अशी आपली कल्पना आहे. वास्तविक राक्षस म्हणजे 'असुषु रमन्तेइति असुरा:' प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहत असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तीवाद आणि स्वार्थीपणाची अमर्याद‍ीत वाढ झाली असून तो महिषासुराच्या रूपाने नांदत आहे. या मह‍िषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. 

वेदांत शक्तीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे. महाभारताचे प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेने भरलेले आहे. महाभारतात पांडवांना धार्मिक मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर केवळ हात जोडून बसून चालणार नाही तर शक्तीची उपासना करावी लागेल असा सल्ला महर्षी व्यासाने दिला होता. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांनीच स्वर्गात जाण्याचे मार्गदर्शन केले होते. 

अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारावर संकट आले तेव्हा तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ती मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाही तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ती उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तीच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे. 'संघे शक्ती: कलै युगे' हे लक्षात ठेवून नवरात्रीच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे. 

या संघटनेच्या मुख्य स्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीने आपल्याला शक्ती प्राप्त होईल, हे सुचित करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात गरबा आणि रासलीलेच्या रूपात देवी भोवताली फेर धरला जातो. देवीजवळ फिरता-फिरता आपण हे मागितले पाहिजे की, 'हे देवी! आम्हाला सदसदवि‍वेक बुद्धी दे. आमच्या संघटनेत अहंकार, द्वेष येत आहे. त्याला तू नष्ट कर.' देवी जगदंबेची ही उपासना नवरात्रीत सुरू होते. परंतु केवळ नऊ दिवसासाठी मर्यादीत न ठेवता कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.


Sunday, October 2, 2011

दैनिक लोकमत


गाव करील ते राव काय करील?


     स्थानिक पुढा-यांच्या किंवा शासनाच्या भरवशावर बसले तर विकासकामे पार पडण्यास वर्षानुवर्षे लागतात. सर्वसाधारणपणे छोट्या-छोट्या गावातील ग्रामस्थांना येणारा हा नित्याचा अनुभव. परंतु नेवासा तालुक्यातील घोडेगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. या गावातील ग्रामस्थांनी (विशेषत: तरुण वर्गाने) नुकत्याच हाती घेतलेल्या सत्कार्यामुळे 'गाव करील ते राव काय करील?' असेच सध्या म्हणावे लागत आहे.


     जागृत देवस्थान 'घोडेश्वरी देवी' हे घोडेगावचे ग्रामदैवत. या देवीचे एक पुरातनकालीन हेमाडपंथी मंदिर गावात आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आणि चैत्र कृष्ण पंचमीला तेथे देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राजकीय दृष्टीकोनातूनही घोडेगावला नेवासा तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपआवार, जनावरांचा आठवडे बाजार (प्रामुख्याने म्हैस आणि बैलांचा), जवळच असलेले शनीशिंगणापूर, ही घोडेगावची मुख्य ओळख. पण कित्येक वर्षे उलटूनही या मंदिराच्या विकासाला लागलेले ग्रहण मात्र सुटले नाही.
     गावात आणि तालुक्यात अनेकदा राजकीय सत्तांतर झाले. दर निवडणुकीला गावच्या विकासासोबत मंदिराच्या विकासाचाही सूर आळविला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावातील तरुणाईनेच पुढाकार घेतला आणि १५ फेब्रुवारीला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. मात्र हे सत्कार्य करीत असताना वर्षानुवर्षे आश्वासनांचे गाजर दाखविणा-या पुढारी किंवा शासनापुढे या तरुणाईने हात पसरले नाहीत. स्वकष्टातून आलेल्या मिळकती मधील 'खारीचा वाटा' बाजूला काढून त्यातून हे सत्कार्य तडीस न्यायचा या तरुणाईचा मानस आहे.
     'घोडेश्वरी देवी मंदिर विकास समिती'च्या माध्यमातून या मंदिर परिसराचा विकास सध्या सुरु आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत, आतील परिसराचे सुशोभिकरण, बगीचा, वाहनतळ आणि प्रवेशद्वार असे या कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी कमीत कमी सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. गावातील कुठलेही धार्मिक कार्य (मग ते यात्रोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव) असो, वर्गणी आलीच आणि घोडेगावात तर वर्गणीला तोटाच नाही. एकट्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची वर्गणी गोळा होते. गावकरी या मार्गाने गेले असते तर मंदिराचे काम केंव्हाच पूर्णत्वास गेले असते.
     पण घोडेगावकरांनी या मंदिराचा विकास करायचा, मात्र त्यासाठी 'बाहेरच्या' लोकांपुढे हात पसरायचे नाही, मदतीसाठी कोणावर सक्ती करायची नाही, असे ठरविले. ज्याची इच्छा असेल तो मदत देईल, या भावनेतून काम सुरु झाले. मंदिराच्या विकासकामात आपापला 'खारीचा वाटा' टाकण्यासाठी इतर ग्रामस्थही मग पुढे आले. कुणी रोख रकमेच्या स्वरुपात, कुणी बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत दिली आणि सत्कार्यात सहभागी झाले.
     बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, ग्रील, रंग, खिळे, असे साहित्य गोळा झाले. ज्या गावक-यांनी अशी मदत दिली, त्यांची नावे रोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जातात. कुणाला 'गुप्तदान' करायचे असेल तर त्याचेही नाव 'गुप्त' देणगीदारांच्या यादीत नोंदविले जाते. ज्यांना यापैकी काही शक्य झाले नाही ते प्रत्यक्ष श्रमदान करायला पुढे आले. एखाद्या दिवशी कामावर कुणी नसले तर गावातील 'तरुणाई' स्वत: उन्हात राबते. त्यामुळे या कामाने आता वेग घेतला असून संरक्षक भिंतीचे काम आता प्रगतीपथावर आहे.
     'घोडेश्वरी देवी'चा यात्रोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसे पाहता २० लाख रुपयांची रक्कम काही थोडी नाही. मात्र ग्रामदेवतेवर निष्ठा ठेवून सत्कार्यासाठी पुढे आलेली 'तरुणाई' देखील आपल्या निश्चयावर तितकीच ठाम आहे. लोकसेवकांच्या स्थानिक निधीतून किंवा शासकीय योजनेतून पार पडलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी मंडळी आपण पाहतो. परंतु घोडेगावची झपाटलेली तरुणाई मात्र वेगळीच. त्यांना प्रसिद्धी अजिबात नकोय.
     या 'तरुणाई'सोबत संवाद साधला असता, ''आम्हाला एकाच ध्यासाने झपाटलंय, ते म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिराचे सुशोभिकरण आणि विकास. त्याकरिता शासकीय योजनेची खैरात किंवा पुढा-यांचा पैसा आम्हाला नको. 'आई घोडेश्वरी'चा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मनात अढळ आत्मविश्वास आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद देखील आमच्या मनगटात आहे.'' असे ते सांगतात. आणखी काय हवे. सत्कार्यासाठी जर गाव एकत्र आले तर अशक्य काय आहे. एकीकडे आजकालच्या युवकांना विकासाचे घेणे-देणे नाही, असा टोमणा मारला जातो. परंतु घोडेगावच्या तरुणांनी मात्र आपल्या कृतीतून परिसरात आणि इतर गावांपुढे नवा आदर्श उभा केला आहे.


Saturday, October 1, 2011

!! घोडेश्वरी !!


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव .
गावच इतिहास फार जुना आहे.
साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव , गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण  झाले असावे . कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते
  गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने  सर्व गावकऱ्यांनी  पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .
एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला ,  त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव , फावडे , खोरे,  घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने  १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली  तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे  गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला . काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही  केले.

  काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका  साधूने  गावाकर्याना  त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले ,त्या नंतर  एका शुभ मुहूर्तावर  तुळजाभवानी ची पूजा करून  विहीर खांदण्यास  सुरुवात केली , पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले ?
               त्या दिवशी मंगळवारच दिवस होता , विहीर खांदण्याचे  काम चालू असतानाच सहा परसाच्या  पुढे आचानक चमत्कार  झाला ,  विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी  म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली , सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला  कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना  भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली
             अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन  गावाच्या पाटलाच्या स्वप्नात  देवी आली  आणि `` मी घोडेश्वरी देवी आहे माझी  प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या  मंदिरात करा , यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून  देवी अंतर्धान  पावली .
           सकाळी  पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना  खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून  त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची  प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात  केली.   त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर  सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या
मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस  विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही ,बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास  सांगितले .
             दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून  गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच  अचानक  विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड  होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे . त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

   विहिरीतून प्रगट झालेल्या  देवीची मुर्ती ही आश्वरुपी , घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले  आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने  गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव  या नावाचा अपभ्रंश होऊन  घोडेगाव हे नाव रूढ झाले
 याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला , बागायत झाला  आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे . .
  मूर्तीचे वैशिष्ट्य  मुर्ती स्वयंभु आसून  कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे , मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी   आसून मोठ - मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .
देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************
प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा  घाना चालत नाही .
कुंभाराचे चाक चालत नाही
तसेच गावात कुणी घोडे पळत नाही ,
स्थानिक सोनार   व्यवसाय गावात चालत नाही .
कुठलाही गुंड , समाज विरोधक  काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही .
 यात्रेत गोंधळ करणारा , मारामाऱ्या करणारा  पुढची यात्रा बघत नाही , हा इतिहास आहे .


 आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन  मंदिर जीर्नौधाराचे  काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे , साथ दिली आहे. काम्पौनडचे  काम पूर्ण होत आले आहे , सभामंडप  एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे . आपणही या कार्यास आर्थिक मद्दत करू शकता









Thursday, September 29, 2011

सरस्वती पूजन


नवरात्र महोत्सवात अश्‍विन शुद्ध नवमीला "सरस्वती पूजन' करण्याचा प्रघात आहे.
देवी सरस्वतीचे वर्णन ऋषी असे करतात-

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना।। 
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।। 

भारतीय वाङ्‌मयात "सरस्वतीयाचा अर्थ दोन प्रकारे आहेएक नदी म्हणून व दुसरा देवी-देवता म्हणून!

सरस्वती नदीची उत्पत्ती 
प्राचीन वाङ्‌मयात सरस्वती ही ब्रह्मदेवांची कन्या म्हणून उल्लेख आहेतिला एकदा पुरुरवा या राजाने पाहिलेतिचे अप्रतिम सौंदर्य पाहून राजा अत्यंत मोहित झालापुरुरव्याने त्याची प्रिया उर्वशीतिच्या मध्यस्थीने या सरस्वतीला घरी बोलविलेत्या वेळी पुरुरव्याला न राहविल्यामुळे सरस्वतीचा कौमार्यभंग केलाहे जेव्हा ब्रह्मदेवांना समजले तेव्हा ते रागावले व दोघांना शाप दिलासरस्वतीला ते म्हणाले, ""यापुढे भूतलावर तू नदी म्हणून वाहत राहशील.'' त्याप्रमाणे ती "सरस्वती नदीम्हणून वाहू लागली.

पद्मपुराणात सृष्टीखंडात सरस्वती नदीची उत्पत्ती सांगितली आहेती अशी -
एकदा भूतलावर वडवाग्नीने प्रचंड असा प्रलय मांडला होतादेव-दानव व सर्व पृथ्वी होरपळून निघत होतीम्हणून ऋषीमंडळींनी ब्रह्मदेवांना यापासून वाचवण्याची प्रार्थना केली.
तेव्हा ब्रह्मदेवांनी या अग्नीला एका पात्रात कोंडून ठेवले व ते पात्र सागराकडे घेऊन जाण्यास कन्या सरस्वतीस सांगितलेकन्या सरस्वती हा अग्नी घेऊन जाण्यास तयार नव्हतीपरंतु पित्याची आज्ञा म्हणून हे अग्निपात्र घेऊन जाऊ लागलीपरंतु अग्नीचे तेज तिला सहन न झाल्यामुळे ती त्यामुळे जलरूप झालीतिचे नाव "सरस्वती नदीहोय.
ही सरस्वती नदी अत्यंत वेगवान अशी नदी असूनवरुणाच्या मुखात पडते. (ऋग्वेद 6.11.63) हिची निर्मिती प्रजापतीकडून झालेली आहेही नदी पर्वतावर उगम पावून सागराला मिळतेपरंतु द्वापारयुगात तिचे जल आटले व राजस्थान वाळवंटात ती अडकून पडली आहेपरंतु पुढे प्रयाग क्षेत्रात ती गंगा-यमुना या नद्यांच्या संगमात गुप्त रूपाने येऊन मिळाली असल्याने या संगमाला "त्रिवेणी संगमम्हणतात.

सरस्वती देवी म्हणून उत्पत्ती 
ब्रह्मदेवांनी सबंध सृष्टी निर्माण केलीत्याबरोबर प्रजोत्पत्तीही केली.ब्रह्मदेवांच्या वामांगापासून शतरूपा राणी व उजव्या अंगापासून स्वायंभुवमनु निर्माण झालेया शतरूपा राणीनंतर सावित्रीब्राह्मणी व सरस्वती या स्त्रिया निर्माण झाल्यायातील सरस्वती ही ब्रह्मदेवांची पत्नी झाली
देवी भागवतात देवीची उत्पत्ती सांगताना सांगितलेकी राधा-राणीच्या जिव्हाग्रापासून या देवीचा जन्म झाला.

ही जेव्हा सगुणरूपात प्रकट झालीतेव्हा तिने श्रीकृष्णाला वरण्याची इच्छा प्रदर्शित केलीपरंतु भगवान श्रीकृष्णाला तिच्याबरोबर राहणे योग्य वाटले नाहीसबब त्याने तिला शाश्‍वत रूप दाखवले व तिचे समाधान करून तिला परब्रह्मस्वरूपी भगवंताला शरण जाण्यास सांगितलेतसेच भगवंताच्या आज्ञेने ती ज्ञानीमहात्मेनिष्ठावान प्रेमळ भक्त यांच्या जिव्हाग्रभागी राहू लागली
पद्मपुराणात पुष्कर माहात्म्यात असे सांगितले आहे, ""एकदा पृथ्वीवर दीर्घ काळ दुष्काळ पडला होतात्याचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्याचे ठरविलेपरंतु यज्ञ कोठे करावाहे ठरविताना त्यांनी स्वर्गातून एक पद्म (कमळभूमीवर टाकलेते पद्म ज्या ठिकाणी पडले ते पुष्करतीर्थ म्हणून प्रसिद्ध पावलेसबंध भारत देशात पुष्कर क्षेत्री फक्त ब्रह्मदेवांचे मंदिर आहे.
या पवित्र क्षेत्रात ब्रह्मदेवांनी यज्ञ सुरू करताना त्यांची पत्नी सरस्वती हिला आवाहन केलेपरंतु ती यज्ञकार्यात वेळेवर येऊ शकली नाहीपण यज्ञकर्माचा मुहूर्त टळू नये म्हणून ब्रह्मदेवांनी इंद्राला दुसरी स्त्री आणण्यास सांगितले. (कारण यज्ञकर्म हे सपत्नीकांनी व पत्नीबरोबरच करावेहा दंडक आहेतेव्हा इंद्राने एक गोप स्त्री आणून गाईच्या मुखातून तिला काढून तिची शुद्धी केली(एक वेदोक्तपुराणोक्त विधी आहेआणि ती ब्रह्मदेवाजवळ बसविलीती"गायत्रीम्हणून प्रसिद्ध पावली.

यज्ञकर्म सुरू झाले आणि काही वेळाने आपल्या सख्यांबरोबर सरस्वती देवी आपल्या लवाजम्यानिशी मंडपात आलीआपल्या जागेवर दुसरी स्त्री पाहून ती रागावली व तिने सर्वांना शाप दिलातो असा

1) ब्रह्मदेवाची पूजा लोक वर्षातून एकदा करतील
2) इंद्राला कुठल्यातरी परक्‍या देशात शृंखलाबद्ध होऊन पडावे लागेल
3) विष्णूने यात सहकार्य केले म्हणून त्याला मानवयोनीत गुराखी व्हावे लागेल (श्रीकृष्ण झाले). 
4) रुद्रांचा शूरपणा नष्ट होईल.
5) अग्नी सर्वभक्षक बनेल
6) ब्राह्मण उपाध्याय यापुढे फक्त दक्षिणा मिळविण्याच्या दृष्टीने धार्मिक विधीयज्ञकर्म करतीलनंतर लक्ष्मीदेवीने तिच्याशी मध्यस्थी केली व सरस्वती देवीचा राग शांत केला.

ब्रह्मदेवाने पुष्कर तीर्थावर सरस्वतीसाठी एक सरोवर तयार केलेकाही दिवसांनी सरस्वतीलक्ष्मीगंगा यांचे तिघींचे एकमेकांशी भांडण झाले.त्यामुळे नारायण परमात्म्याने सांगितलेकी सरस्वती एक अंशरूपाने पृथ्वीवर नदी म्हणून राहील व एक अंशरूपाने ब्रह्मदेवांची पत्नी म्हणून राहील.
कलियुगाची पाच हजार वर्षे लोटली म्हणजे ती नदीचा गुप्तपणा सोडून उघडपणे वाहू लागेलत्यानंतर ब्रह्मदेवाने तिला आवाहन केलेतेव्हा ती म्हणाली, ""मला पापी लोकांचा संपर्क न व्हावा म्हणून मी गुप्त राहीन व आपली आज्ञा होता क्षणीया पुष्कर क्षेत्रात प्रकट होईन.''

तसेच लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदणार नाहीतअसे सांगितलेत्यामुळे धनवान माणूस बुद्धिमान असतोअसे नाही व बुद्धिमान माणूस धनवान होईलचअसे असू शकत नाहीकेवळ ईशकृपा व सद्‌गुण संपदेने या एकत्र नांदताना दिसतात
सरस्वती देवीचे कार्य 
ऋग्वेदात या देवीचे गुणगान असे केले आहेकी ती ब्रह्मदेवाची पत्नीसर्वांची रक्षणकर्तीअन्नपाणी पुरविणारीसर्वांना सामर्थ्यसंपन्न करणारीदान देणाऱ्यांना उत्तम वरदान देणारीधन्याला संतुष्ट करणारीयज्ञकर्मात विपुल धान्य देणारी आहेतसेच शुक्‍ल यजुर्वेदात तिचे वर्णन आले आहेया वेदात तिला इडाभारती व सरस्वती या प्रजाय देवता (नव निर्माण करणाऱ्याअसून मरुतविराटगायी या इंद्रिय शक्ती व दीर्घायुष्य देवोही प्रार्थना करतात

या सरस्वतीला वेळकाळ व कार्यानुरूप भारतीब्राह्मीपुटकारीशारदा,वागीश्‍वरीवीणा इत्यादी नावे प्राप्त झाली आहेत.
प्रामुख्याने ही सरस्वती विद्यादेवता म्हणून अवतीर्ण झाली आहेब्रह्मदेवांची आज्ञा म्हणून तिने सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगाच्या प्रारंभी पवित्र व योग्य मानवाच्या जिव्हाग्रावर प्रवेश केलाया भूतलावर प्रथम तिने तमसा नदीवर एका ऋषींच्या जिव्हेवर प्रवेश केलाते ऋषी म्हणजे वाल्मीकी होतव्याधाने एका क्रौंच पक्ष्याला ठार केलेत्याची प्रिया शोक करीत असता वाल्मीकींनी त्या पक्ष्याची शुश्रूषा केलीहे करुणाजनक दृश्‍य पाहून सरस्वतीला दया आली आणि त्याचे वर्णन करण्यासाठी ऋषींच्या मुखात प्रवेश केल्याबरोबर या भूतलावर पहिले काव्य बाहेर पडले.

ते म्हणू लागले
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्‍वतीः सम। 
यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्‌।। 


या काव्यामुळे वाल्मीकींना आदिकवीचा मान मिळाला
ऋग्वेदात 10-32-12 मध्ये सरस्वतीचा संबंध बुद्धीशी व अमृत शब्दाबरोबर जोडला आहेकारण वेदवाङ्‌मयात "ज्ञावर्गातील काही देवता स्वीकारल्या आहेतया "ज्ञावर्गातील वाग्‌देवता म्हणून ही सरस्वती आहेया "ज्ञा'वर्गातील देवतादेवतांचेतसेच मानवाचे कार्य समृद्धी व फलोत्पादन करणाऱ्या म्हणून आहेत.
त्यामुळे मातृशक्ती म्हणून हिचे महत्त्व मानले आहेसरस्वती देवी बुद्धीला गतिमानता व तेजस्विता देत असल्याने सर्व ऋषीसाधूसंत महात्मे हिचे गुणगान करतातहीच भगवती सरस्वती भाषाकाव्यकलाअलंकार इ.गुणांची जननी म्हणून मानली आहे.

ही सरस्वती देवी हंसवाहिनी आहेनाथ महाराज तिचे वर्णन करतात


सारासार निवडी जनी। 
त्या हंसावरी हंसवाहिनी।। 


अशी ही देवता असूनसर्व वस्तुमात्रांमध्ये योग्य निवडीचे ज्ञान देणारी ही देवता आहे
सरस्वती देवीचे स्वरूप -
सरस्वती देवी ही शुभ्रकमलावर किंवा हंसावर आरूढ दिसतेहिचा वर्ण शुभ्र असून शुभ्र वस्त्र परिधान केले आहेही चतुर्भुजा असून उजव्या हातात अक्षमाला व व्याख्यानमुद्रा आहेडाव्या हातात पुस्तक व कमळ आहेकधी स्फटिक माला गळ्यात असताततर कधी वीणा हातात असतेगळ्यात यज्ञोपवीत असून अंगावर रत्नजडित अलंकार आहेतशृंगेरी मठात या वर्णनाबरोबर सरस्वतीच्या हातात मालाअमृतकुंभपोपट व हंसवाहनी असे स्वरूप स्वीकारले आहे
असे या देवीचे स्वरूप आहे
नवरात्रातील पूजन -
नवरात्र उत्सवातसरस्वतीचे म्हणून काही भागांत परंपरेनेआवाहन अष्टमीला, "पूजननवमीला, "विसर्जनदसऱ्याला करतात किंवा सप्तमी,अष्टमी व नवमी तिथीला आवाहनपूजनविसर्जन विधी करताततर काही भागांत फक्त नवमीला सरस्वतीचे पूजन करतातमहाराष्ट्रात साधारणपणे घराघरात नवमीला सरस्वती पूजनाचा विधी करतातया पूजनात ग्रंथपोथी,पुस्तक यांचे पूजन असतेतसेच मूर्ती वा फोटोचे पूजन (वर वर्णन केल्याप्रमाणेकरण्याचा प्रघात आहे
अशा सरस्वती देवीस शब्दरूपाने वंदन करू या!

सौजन्य -- सुस्मिता  जोशी

महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे


महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे

१) कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई)
२) माहूरगडची रेणुका (एकविरा, यमाई)
३) तुळजापूरची भवानी
४) वणीची सप्तशृंगी
हि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे होत.
हि साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. त्याप्रमाणेच साडेतीन शक्तिपीठे क्रमशः अशी आहेत :
१) मातापूर
२) तुळजापूर
३) कोल्हापूर
४) सप्तशृंगी
'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी.
सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. सात शिखरांच्या समुदायास सप्त श्रुंग म्हणून ओळखले जाते. यातील एका अतियूच्च शिखरावार देवीचे मूळ स्थान आहे. पण ते ठिकाण अतिशय दुर्गम असल्यामुळे वर्षातून एकदा चैत्रपौर्णिमेला ध्वज लावण्यासाठी एकच व्यक्ती मूळ स्थानाला जाते. पुराणातील वरणनाप्रमाने ह्याच शिखरावर मार्कंडेय ऋषींनी घोर तप केले होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी देवी इथेच प्रकट झाली होती. ते मूळ स्थान अत्युच्च शिखरावरतीच आहे. ह्या ॐकार पर्वतावर चढून जाणे आजही कठीण आहे. मांडूक्य उपनिषदानुसार साडेतीन मात्रा ॐकार स्वरूपी प्रतिक रूप या शक्तीपीठावरती साधना करणार्यांना भक्ती व मुक्ती दोन्ही बरोबरच मिळतात.
माहुरची रेणुका महाकाळी पीठ आहे. सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात वर्णन केलेल्या महाकालीच्या दहा नावात एकवीरेचे नाव आहे. एकविरा म्हणजेच रेणुका किंवा यमाई होय. कोल्हापूर महालक्ष्मीचे शक्तीपीठ आहे. तुळजा भवानी महासरस्वतीचे रूप आहे. सात मातृका अर्ध मात्रा स्वरूपी व अर्ध पीठ सप्तशृंगी आहे.
तुळजा भवानी शिवरायांची आराध्य दैवता व महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहे. पुराणात या देवीची तीन नावे आढळतात 'त्वरिता', 'तुरजा', ' तुळजा'. त्वरित म्हणजे शीघ्र प्रसन्ना होणारी 'त्वरिता' आणि भक्तांच्या हाके सरशी धावणारी 'तुरजा'. 'तूर' म्हणजे त्वरित + जा म्हणजे जाणारी, त्वरित धावणारी ती ' तुरजा'. ' तुरजा' या शब्दाचा अपभ्रंश 'तुळजा' झाला (र-लयोर्भेदः ).
कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतात. या क्षेत्राला 'महामातृका पीठ' व 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्र) प्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहे. या मंदिरात पाच शिखरे व तीन मंडपे आहेत. गर्भ गृह मंडप, मध्य मंडप व गरुड मंडप हे तीन मंडप होत. प्रमुख व विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
माहूरला मातापूर असे म्हणतात. याच क्षेत्री भगवान दत्तात्रेय नित्य भिक्षाग्रहण (भोजन) करतात. या कुंडातून, सती कुंडातून परशुरामाच्या पुत्र प्रेमापोटी,वात्सल्यापोटी देवी रेणुका प्रकट झाली. इथे केवळ देवीचा चेहराच आहे पूर्ण मूर्ती नाही, केवळ शिरोभागच आहे.
ऋग्वेदातील उषासुक्तामध्ये उशाला आदितीमुखा म्हटले आहे. हिलाच अनार्वा व दिव्या गौम्भ नावाने संबोधिले जाते. रेणुका हे देवमाता अदितीचे रूप आहे म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतात. वेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख वारंवार आढळतो. जमदग्नी हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार मंत्रदंष्ट्रा ब्रह्मर्षी होत. ऋग्वेदाचा दशमंडलाचा द्रष्टा तसेच, उश्मांड हवन विधीचा प्रचारक तसेच ससर्परी विद्या आणि श्राद्ध विधीचा रचयिता महर्षी जमदग्नी हे होत. महर्षी जमदग्नीचे आश्रम व रीशिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहेत. तरी पण मूळ स्थान म्हणजे सती स्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहे. रेणुका हि अग्नी तत्वाशी संबंधित आहे. अग्नी ज्वालावर अधिष्ठित व अग्नी ज्वालावर परीवेश्ठीत रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते त्यामुळे रेणुका हि अग्नी देवता आहे. देव माता अदिती हि प्रलायाग्निवर आरूढ व अग्नीवलयांकित आहे. त्या प्रमाणे चीदग्नी अग्नी संभवा रेणुका जमदग्नी बरोबर विवाह बद्ध झाली. सूर्य व अग्नी देव तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले. विवाहाच्या वेळी दोघांनी श्रवताग्नी व चेताग्निचे व्रत ग्रहण केले व शेवट पर्यंत ते व्रत केले. व शेवटी हि अग्नीच्या चिताग्नी मध्ये लुप्त झाली व पुन्हा अग्नी मधून प्रगटली भक्त कल्याणासाठी शाश्वत रुपात प्रतिष्ठित झाली ते क्षेत्र म्हणजे माहूर. भगवती अदिती रेणुका, मूळशक्ती, अनादी शक्ती व पराब्रःमेची महाशक्ती आहे. दशावतारा मध्ये वामन व परशुराम हे दोन अवतार ब्राह्मण कुलसंभूत अवतार आहेत. दोघांची माता अदिती व रेणुका होय. परशुरामाच्या कारणामुळे पुत्र वत्सला पृथ्वीवर सदैव अधिष्ठित रेणुका हीच होय. सर्व देवी देवता अवतार कार्य समाप्ती नंतर निजधामास गेले पण रेणुका देवी अंतर्धान पावल्यावर मातेच्या ममतेने पुन्हा पृथ्वीवर प्रगटली ती कायमचीच.

स्वतः आदीशक्ती स्वरूपिणी , पतीदेव साक्षात शिव आणि पुत्र परशुराम म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, हा त्रिवेणी संगम. आदिशक्ती सती जाताना प्रत्यक्ष महाविष्णू(परशुराम) मंत्राग्नी देत आहेत. सृष्टी संचालक त्रिदेव दत्तात्रेय सती कर्माचे पौरोहित्य करीत आहेत असा अद्भुत प्रसंग विरळाच.
सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने तुकडे केले ते जिथे जिथे पडले ती सर्व ठिकाणे शक्तिपीठे बनली. माहूर क्षेत्री सतीचे स्तनद्वय पडले. मातृदेहा मध्ये वात्सल्य रसाचे स्थान म्हणजे स्तनद्वय किंवा पयोधर होय. या मातृत्वाच्या वात्सल्याचे मूळ ठिकाण म्हणजे पुरःस्थल म्हणजेच माहूर.
 — with Sameer Mokate and 24 others